Skip to main content

"पाणीपुरी"



आजची गम्मत सांगतो :
खूप दिवसांनी काही कारणांनी बाजारात जायचा प्रसंग आला,तहसीलदार कचेरी समोर माझा आवडता पाणीपुरीवाला दिसला, म्हंटलं चोपावी पाणीपुरी (असं चुपचाप, न सांगताच हा कार्यभाग साधावा लागतो, नाहीतर पावसाळ्याचे दिवस आहेत,काविळीची साथ सुरु आहे,कसलं ते घाण पाणी,शी, कुठे गटारीच्या काठी उभी असते ती गाडी,डॉक्टर असून समजत नाही का? वगैरे गोष्टींचा सुजाताकडून भडिमार होतो आणि वर,मी छान घरीच बनवीत जाईन आता(ही धमकी) आता काय सांगू यांना,त्या भय्याच्या कळकट हातानी दोन मडक्यातल्या पाण्यात बुचकळवून काढलेल्या पाणीपुरीची चव घरच्या चकाचक स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातील पाण्याला कुठून येणार ते?)
असो, तर सांगायचा मुद्दा हा होता की पाणीपुरीसाठी मी भय्याच्या गाडीजवळ गेलो, तिथे बायकांची बरीच गर्दी होती,बऱ्याच माझ्या पेशन्टस होत्या,आशा वाटली की नंबर जरा प्रयोरिटीने लागेल म्हणून, पण कसलं काय, जरा म्हणून कुणी मागे हटायला तयार नाही,उलट नजरेत बदला घेतल्याचा आंनद (तुमच्या दवाखान्यात आम्ही नाही बसत तासनतास,नंबर लावून, आता भोगा.)
राहिलो बुवा उभा,केविलवाणा होऊन माझा नंबर यायची वाट पाहत.

तसं, पाणीपुरी मला जरी फार आवडत असली, तरी त्याबद्दल एक प्रश्न आहे माझ्या मनात की तिचा आकार एवढा मोट्ठा का असतो?हे लोक आम्हाला काय मगरीच्या कुळातले समजतात काय? मोठ्ठ तोंड उघडून कशीबशी तोंडात ढकलली आणि जबडा बंद करण्याचा प्रयत्न केला, की ती पुरी फुटून ते तिखटजाळ पाणी सरळ श्वासनलिकेत दाखल, आणि मग तो जीवघेणा ठसका! आजूबाजूच्या लोकांनी सहानुभूती दाखवावी ना,छे,त्यांच्या चेहऱ्यावर आंनद की आता हा थांबवणार आणि आपला नंबर लागणार. जाऊद्या, ती स्टेज यायचीच बाकी कारण समोरच्या बायका थांबायलाच तयार नाहीत.पाहता पाहता मला या बायकांची पाणीपुरी खायची हातोटी आणि अपार कौशल्य नजरेत भरले : एक पुरी तोंडात, एक हातात,आणि तिसरी प्लेटमध्ये!शेजारचीला देऊन भय्या आपली पुरी समोर करायच्या आत यांची प्लेट त्याच्यापुढे! ठसका न लागू देता मटामटा खाणं सुरु,व्वा! बरं, तीनचार लोक लायनीत असतांना आपला नंबर या बायका आणि तो भय्या बरोब्बर लक्षात ठेवतात,हां, आणि कुणाच्या किती पुऱ्या झाल्या आणि किती बाकी राहिल्या हा हिशोब ही चुकत नाही कधी!
पाणीपुरी खाणं झाल्यावर न चुकता भय्याकडून "पपडी" किंवा "सुक्की पुरी"खायचीच असते(ती हिशोबात नसते बरं का!)

तर काय सांगू मंडळी आज (आजही) माझा नंबर लागला नाही कारण माझा नंबर येईपर्यंत पाणी सम्पले होते.😔

जड पावलांनी मी घराकडे वळलो,आणि मग मनात प्रश्न आला, ही मगरीसारख्या जबड्यानी टपाटप पाणीपुऱ्या खाऊन माझ्या तोंडाचा घास हिरावणारी बाई काल मला क्लिनिकमध्ये रिक्वेस्ट करत होती की कॅल्शियम च्या गोळ्या जरा छोट्या नाहीका देता येणार, मोठ्या गोळ्या तोंडात जात नाहीत!

आहेका उत्तर कुणाकडे?

Comments

  1. Hello Sir. I am Dr. Omkar Halwai, an ENT Surgeon practising in Mumbai. I used to work as Consultant and Assistant Professor in Somaiya Medical College under Dr. Dinesh Vaidya Sir. He told me about your blog yesterday and forwarded me the link. Read the first 3 articles just now.

    I must say that you write very well Sir. Your sense of humour is simply brilliant and it hits home even more because it is in Marathi.


    Also, there is a strong sense of sincerity and honesty which comes through in your writings.

    I will definitely be following your blog from here onwards.

    Me and Vaidya Sir share a liking of literature and cinema among many other things and we discuss about these very often.
    Inspite of me having left Somaiya, we are still in touch. He is a more of a mentor and a friend to me. Thanks to him, I got to know about you.

    I also write occasionally and my blog link is
    ohalwai.blogpost.in.
    (Although I write in English)

    Please go through it at your leisure.

    Regards,
    Dr. Omkar Halwai.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks dear Omkar,nice to know you liked my ideas.I will surely read your blog & will revert back.Dinesh is one of the finest souls & me proud to be friends.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात,निव

माझे आई-बाबा(सासू-सासरे)

नमस्कार मंडळी.🙏 आज मला आई-वडिलांसारखेच प्रेम देणारे सासू-सासरे श्री दिनकरराव आणि सौ मंगलताई यांच्या लग्नाचा सत्तावनावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा तर देतोच,पण त्यांच्या जीवनप्रवासावर थोडा दृष्टिक्षेप टाकण्याचाही प्रयत्न करतोय. माझी यांच्याशी पहिली भेट झाली ती हरदासकाकांच्या घरी,सिडको,औरंगाबाद येथे,जेंव्हा माझी लग्नाची तयारी नसतांना माझे बाबा,हरदासकाका आणि दिनकरराव यांनी संगनमत करून सुजाता आणि माझी भेट घडवून आणली तेंव्हा.त्या सुरस कथेचा एक वेगळा एपिसोड आहे त्यामुळे इथे तो भाग गाळतोय. प्रथमदर्शनी भावला तो मला या कुटुंबाचा साधेपणा आणि हसमुख,आनंदी चेहेरे!  दिनकररावांची उंचीपूरी,दणकट शरीरयष्टी,लोभस,स्टायलिश व  अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. मंगलताई तर गोऱ्यापान,घाऱ्या डोळ्यांच्या आणि माझ्या आई-मावशीची बहीणच शोभणाऱ्या,प्रसन्न,परिपक्व,मोहक चेहरा लाभलेल्या. ही जी ओळख झाली ती लग्नानंतर हळूहळू पटली. दिनकर मनोहर बाब्रस. जन्मतारीख ६/६/१९३६. जन्मगाव बीड. वडील पोस्ट खात्यात नोकरीस होते.दोन मोठे भाऊ,दत्ताकाका उर्फ अण्णा आणि भास्करकाका,एक बहीण,अनुसूयाबाई. सन १९३९ मध्ये दिनकरराव ३ वर

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन*

*आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन* मित्रांनो, काल खूप दिवसानंतर रेल्वेचा भोंगा ऐकला ज्याला "सायरन"असे म्हणतात.आमच्या लहानपणी सर्व भुसावळकर जनतेच्या जीवनाचा हा भोंगा अविभाज्य अंग असायचा. डी.एस.ऑफिस(आताचे डी.आर.एम.ऑफिस) च्या छतावर हा बसविलेला आहे आणि आवाज इतका मोठा आहे की संपूर्ण शहरात सहज ऐकू यायचा,आता शहर खूप वाढल्यामुळं माहीत नाही सगळीकडे ऐकू येत असेल की नाही ते. सकाळी आठ,दुपारी चार आणि रात्री बारा अशा तीन वेळा हा भोंगा वाजत असे. रेल्वेच्या बहुतेक ड्युट्या सकाळी आठ ते दुपारी चार,दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी आठ अशा असायच्या. सकाळच्या ड्युटीला मॉर्निंग म्हणायचे पण दुपार आणि रात्रीचीला चार-बारा आणि बारा-आठ असेच प्रचलित  नाव होते. हे भोंगे अथवा सायरन्स या ठराविक वेळीच आणि एकदाच वाजायचे. एकावेळी एकापेक्षा जास्तीवेळा वाजले,तर त्याचा वेगळा अर्थ असायचा. तीन वेळा वाजले याचा अर्थ भुसावळ स्टेशन किंवा यार्ड परिसरात गाडी किंवा डब्बा रुळावरून घसरलाय,डिरेलमेंट झालीय किंवा अपघात झालाय,पाच वेळा वाजले म्हणजे भुसावळ डिव्हिजन मध्ये हा प्रकार घडलाय आणि सात वेळा वाजले म्हणजे भ