Skip to main content

"भटक्या कुत्र्यांची जीवघेणी समस्या"



आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच जळगावात"भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यानं फोडला बालिकेचा डोळा" ही हृदयद्रावक बातमी वाचली.
पंधरा दिवसांपूर्वी भुसावळला हनुमान नगरातील एकतीस वर्षाच्या तरुणाचा गाडीवर जात असतांना कुत्री मागे लागल्यामुळे तोल जाऊन गाडी पडली व डोक्याला इजा होऊन मृत्यू झाला.
जळगावचा एक प्लंबर आणि मुंबईच्या कांदिवलीत एक बालक हेसुद्धा पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळं मृत्युमुखी पडल्याच्या घटना आत्ताआत्ताच्याच आहेत.

भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारे अपघात यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. पहाटे मॉर्निंग वॉकला जातांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.माझ्याकडे रात्री-बेरात्री इमर्जन्सी केससाठी येणारे अनेस्थेटीस्ट, कुत्र्यांच्या  दहशतीमुळे सोप्या असलेल्या टू व्हीलरवर न येता जिकिरीच्या फोर व्हीलरवर येतात बिचारे!

या सर्वांना कारणीभूत आहेत "पिपल फॉर अनिमल्स" या दिल्ली येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि राष्ट्रीय प्राणिहक्क आयोगाच्या श्रीमती मनेका गांधी! १९९३ पासून त्यांच्या चळवळीमुळे भटक्या कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचा कायदा आला आणि या बेवारस कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढू लागली. कुत्र्यांना माणुसकीची वागणूक आणि माणसांच्या नशिबी कुत्तेकी मौत असा प्रकार झालाय!
काही वर्षांपूर्वी मी श्रीमती मनेका गांधी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले होते,त्यातील काही ठळक मुद्दे देत आहे :

* जगभरात "रेबीज"या पिसाळलेला कुत्रा चावून होणाऱ्या रोगाने वर्षाकाठी ५० हजार लोकांचा मृत्यू होतो,त्यातील ३० हजार लोक एकट्या भारतात मरतात. भारतात मृत्युच्या कारणांची नोंद करण्यात फार अनागोंदी असल्यामुळे खरा आकडा यांच्या दहापट असू शकतो!

* भारतातील बेवारस कुत्र्यांची संख्या ३५ दशलक्ष आहे.एक कुत्री दरवर्षी किमान ५-६ पिल्लांना जन्म देते,त्यातली २-३ ही वाचली तरी काही वर्षांत कुत्र्यांची संख्या लोकसंख्येची बरोबरी करेल.

*हत्ती,माकडे,साप,कासव,गुरे-ढोरे या इतर प्राण्यांप्रमाणे पर्यावरण राखण्यास कुत्र्यांचा काहीही उपयोग नाही.

* कुत्र्यांमुळे केवळ रेबीजच नव्हे तर हायड्याटिड सिस्ट,लेप्टोस्पायरॉसिस,ब्रुसेलोसिस,काला आजार ई. घातक रोगसुद्धा पसरतात.रेबीज हा आजार इतर उष्ण रक्ताच्या प्राण्यांपासूनही होतो,परंतु २५% कारणीभूत कुत्रीच असतात.

* रेबीज हा आजार १००% प्राणघातक आहे आणि अजूनपर्यंत तरी त्यावर उपचार सापडलेले नाहीत.

* रेबिजची लस (vaccine) अतिशय महाग आहे.कुत्रा चावल्यावर रेबीजपासून खऱ्या अर्थाने पूर्ण बचावासाठी HRIG आणि HDCV अशा दोन्ही लसी द्याव्या लागतात,यांची किंमत जवळजवळ १५ हजार असते,आणि सरकारी दवाखान्यात यातील HRIG ही लस बरेचदा उपलब्ध नसते.

* हाफकीन इन्स्टिट्यूट या सरकारी संस्थेत मेंढयांपासून लस बनवायचे,परंतु मेंढयांची दया आल्यामुळे तिचे उत्पादन बंद झाले,हासुद्धा प्राणिमित्रांचाच प्रताप!

* कुत्र्यांचे निर्बिजीकरण(Animal birth control)ही एक अतिशय खर्चिक योजना आहे व त्याची अमंलबजावणी कठीण आहे. मुंबईत दरवर्षी ४० हजार कुत्री मारली जायची .१९९३ पासून त्याऐवजी केवळ ५ हजार कुत्र्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया होते,उरलेले ३५ हजार गेल्या २५ वर्षात चक्रवाढ व्याज दराने किती वाढली असतील याचा विचार तुम्हीच करा.

या सर्वांचा मतितार्थ असा,की प्राणीमित्र जरूर व्हा,पण जरा व्यावहारिक होऊन माणूसमित्र होण्याचेही विसरू नका!

Comments

Popular posts from this blog

"लोकसंख्येचा भस्मासुर- देशापुढील मुख्य समस्या" राज्यकर्त्यांची डोळेझाक, जनतेची उदासीनता!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण केवळ एकाच गोष्टीत लक्षणीय प्रगती केलीय,ती म्हणजे भरमसाठ,अनिर्बंधित,अनियंत्रित प्रजनन! १२५ कोटींचा आकडा पार करूनही आपली सुसाट घोडदौड सुरूच आहे. पुढील वीस वर्षांत आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून बहुमान मिळवू,परंतु तेंव्हा देशातील परिस्थिती कशी असेल याचा कुणीच विचार करतांना दिसत नाही. जेवण करतांना सशस्त्र रक्षक उभे ठेवावे लागतील पहारा द्यायला, नाहीतर भूकी जनता जेवणाचे ताट पळवून नेईल. चोरी,दरोडेखोरी, लूटमार भरपूर वाढलेली असेल,कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोचलेली असेल. सद्ध्याच देशातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावतो आहे.त्यामुळे नैराश्य आणि उदासीनता येऊन हे तरुण पैश्यासाठी काहीही करायला मागेपुढे पहात नाहीत.(असे ऐकले आहे की मुंबईत फक्त पाच हजार रुपयांसाठी खुनाची सुपारी घेणाऱ्या तरुणांची रांग आहे!) काय होईल स्थिती जेंव्हा या अँग्री यंग मेन्स ची संख्या दुप्पट होईल?  स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे झाली तरी आरक्षणाची नीती,कोणतेही सरकार गठ्ठा मते जाण्याच्या भीतीपोटी बदलत नाही.यामुळे,सरकारी नोकरीत खुल्या गटात आधीच जागा कमी उरल्यात...

Senseless Sense of Well Being

Hello friends. There are a few side effects of development. The one I am seeing obviously is the spurt of Wellness-Fitness centers,Gymnasiums,Spiritual Gurus holding Satsangs,verious diet planners,Weight loss-inch loss centres,Personality development courses,Career guidance centres & many more.We feel that unless we do such courses,we & our children cannot progress, be successful,wealthy & achieve peace of mind. I wonder how the  previous generation managed to do well without having the advantages of these schools. The Tatas,Birlas,Ambanis, Mahindras must have been real lucky,isn't it! Infact,the advent of internet,it's widespread use, resulting in an outburst of knowledge(many times incomplete & confusing) has changed the psyche of the people & these agencies take advantage of this situation to make money. This has become a status symbol amongst the riches,who can afford,but the poor are also lured & made to spend in an attempt to uplift their ...

मागे वळून पाहतांना

  मागे वळून पाहतांना - डॉ.आशुतोष केळकर,भुसावळ. भुसावळ हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं शहर आहे.रेल्वेचं अतिशय महत्वाचं जंक्शन असून त्यामार्गे संपूर्ण भारताशी जोडलं गेलंय.रेल्वेचे डीझल/इलेक्ट्रिक लोकोशेड्स,अत्याधुनिक झोनल ट्रेनिंग सेंटर,दोन मोठे आयुधनिर्माणी कारखाने,सेनेची एक संपूर्ण तोफखाना बटालियन,एक हजार मेगावॉटचे औष्णिक विद्युत केंद्र तिथे आहेत.त्याअनुषंगाने स्थायिक झालेला मोठा आणि बऱ्यापैकी सधन पगारदार वर्ग आहे.निकड आहे ती त्यांच्या गरजा पुरवणारी व मनोरंजन करणाऱ्या सुसज्ज  बाजारपेठेची.वैद्यक क्षेत्रातही स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्टस,डायग्नोस्टिक सेंटर्स,आयसीयू,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स,कॅथ लॅब्स,रेडियोथेरपी सेंटर्स यांची मोठी कमी आहे. राजकारणी लोकांनी वैयक्तिक लक्ष घालून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. डॉक्टर आणि त्यांच्याशी निगडित(स्पेशालिस्टस,सुपर स्पेशालिस्टस,फार्मा कम्पन्या,डायग्नोस्टिक सेंटर्स,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ई.)यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन मागच्या ३०-४० वर्षात अमूलाग्र बदललाय. विज्ञानाची प्रगती,इंटरनेटमुळे ज्ञानाचा वेगाने हो...